Saturday, February 4, 2012

अस्सा हा महाराष्ट्र

  • महाराष्ट्रात ३५ जिल्हे असून ते ६ प्रशासकीय विभागात विभागलेले आहेत. ६ विभाग: कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद , अमरावती आणि नागपूर.
  • राज्यात एकूण भौगोलिक क्षेत्र ३.०८ लक्ष चौ. कि.मी. इतके आहे.
  • राज्यात २२४.५ लाख हेक्टर जमीन लागवडीखाली आहे तर ५२.१ लाख हेक्टर जमीन वनांखाली   आहे.
  • स्थूल  राज्य उत्पन्नातील कृषी आणि संलग्न क्षेत्राचा हिस्सा ११ टक्के इतका आहे.
  • तर औद्योगिक आणि सेवा क्षेत्राचा मिळून ८९ टक्के इतका आहे.
  • देशातील पशुधनात राज्याचा हिस्सा ६.८ टक्के आहे.
  • 'महिला  व बाल विकास ' या स्वतंत्र विभागाची स्थापना करून अर्थसंकल्पीय तरतूद करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य होते.
  • वातावरण बदलाच्या समस्येवर ठोस कृती आराखडा तयार करण्यासाठी राज्य शासनाने 'द एनर्जी अंड रिसोर्सेस इंस्टीटयूट '(टेरी) या संस्थेबरोबर करार केला आहे.
  • भारतातले पहिले 'आधार गाव ' ठरण्याचा बहुमान नंदुरबार जिल्ह्यातील टेंभली गावाला मिळाला, हि नोंदणी २९ सप्टेंबर २०१० रोजी करण्यात आली.
  • राज्यात माहिती आणि तंत्रज्ञान संचालनायास  आधार कार्यक्रम राबविण्यासाठी प्रमुख संस्था म्हणून नेमण्यात आले आहे.
  • "द्वार वितरण व्यवस्था " ह्या प्रकारची सार्वजनिक वितरण व्यवस्था आदिवासी तसेच दुष्काळग्रस्त भागामध्ये राबविली जाते.
  • सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत गहू, तांदूळ, पामतेल, साखर आणि तुरडाळ या पाच वस्तूंची किंमती स्थिर ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
  • २०१० हे राज्याच्या निर्मितीचे सुवर्णमहोत्सवी  वर्ष होते.
  •  तेराव्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार २०१०-२०१५ या कालावधीसाठी महाराष्ट्राचा केंद्रीय करांतील राज्यांना वितरणासाठी निश्चित केलेल्या हिस्स्यापैकी ५.१९९ % इतका आहे . तो १२ व्या आयोगाच्या शिफारासीपेक्षा जास्त आहे.
  • राज्यावरील ऋणभार १८३८२५ कोटी रु. इतका आहे.
  • रिझर्व बँकेने २००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना वित्तीय सेवा देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. 

No comments:

Post a Comment