Tuesday, January 21, 2014

डॉ. बाबासाहेब उर्फभीमराव रामजी आंबेडकर





Birth Date - 14 April 1891Birth Place - Mahu (Madhya Pradesh)
Original Surname - Ambavade (Ratnagiri)
Death - 6 December 1956
समाधी - चैत्यभूमी, दादर (मुंबई)
प्राथमिक शिक्षण रत्नागिरी येथे झाले
माध्यमिक शिक्षण सातारा आणि मुंबई येथे झाले
महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे झाले
घटनाक्रम -
* १९०६ - रमाबाईशी लग्न झाले
* १९०७ - मेट्रिक परीक्षा पास
* १९१३ -प्राचीन भारतातील व्यापार (Ancient India Commerce) हा प्रबंध सादरकरून कोलंबिया विद्यापीठाची M.A. डिग्री संपादन केली. यासाठी त्यांना सयाजीरावगायकवाड यांचे आर्थिक पाठबळ मिळाले.
* १९१६ - भारताचा राष्ट्रीय नफ्यातील वाटा(National Dividend of India) हा प्रबंध सादर करून कोलंबिया विद्यापीठाची पी. एच.डी. मिळवली. यावेळी सयाजीराव गायकवाड यांचेचआर्थिक पाठबळ मिळाले.
* १९१६ -Cast in India - हा ग्रंथलिहिला.
* १९१८-१९२० - मुंबईतीलसिडनेहॅममहाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यकेले. वाणिज्य आणि अर्थशास्त्राचे ते प्राध्यापक होते.
* १९२० - ३१ जाने. रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या मदतीनेमूकनायक हेपाक्षिकसुरु केले.
* १९२०-शाहू महाराजांच्या आर्थिक पाठबळाने इंग्लंडला कायद्याच्या अभ्यासासाठी गेले.
*१९२० - माणगावच्या अस्पृश्यांच्या परिषदेचे अध्यक्षपद भूषविले
* १९२३ - "पैशाचा यक्षप्रश्न" हा शोध प्रबंध लिहून Bar At Law ची पदवी मिळविली (लंडन)
* १९२४ - २० जुलै रोजी "बहिष्कृत हितकारिणी सभा"स्थापन केली.
* १९२६ - मुंबई कायदे मंडळाच्या सदस्यपदी नेमणूक (१९२६-१९३६)
* १९२७ - ३ एप्रिल रोजी'बहिष्कृत भारत'हे पाक्षिक सुरु केले. याच वर्षी'समता' हे वृत्तपत्रसुरु केले.
* १९२७ - २० मार्च रोजीरायगड जिल्ह्यातील महाड येथेडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालीचवदार तळ्याचा सत्याग्रहझाला. (१९३७ साली हे तळे सर्वांसाठी खुले करण्यातआले )
* १९२७ - २५ डिसेंबर रोजीमहाड येथे मनुस्मृतीचे दहनकरण्यात आले.
* १९२७ - महाड येथे अस्पृश्य परिषद भरवली
* १९२७ - 'समता समाज संघा'ची स्थापना केली
* १९२८ - सायमन कमिशनसमोर साक्ष
* १९३० -नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रहघडवून आणला. १९३५ साली हे मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात आले.
* १९३० ते १९३३ दरम्यानच्या तिन्ही गोलमेज परिषदेत अस्पृशांचे नेतृत्व
* १९३२ - २४ सप्टेम्बर रोजीम. गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातपुणे करारझाला यालाचयेरवडा करारअसेही म्हणतात.
* १९३५ - पहिल्या पत्नी रमाबाई यांचे निधन झाले.
* १९३६ - 'स्वतंत्र मजूर पक्षा' ची स्थापना केली.(१९३७ च्या प्रांतिकनिवडणुकीत या पक्षाने १५ जागा जिंकल्या.)
* १९४२ - आप्पा दुराई यांच्या मदतीने नागपुर येथे 'अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन' ची स्थापना केली.
* १९४६ - मुंबई येथे 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी' आणि 'सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स' ची स्थापना केली
- 'मिलिंद महाविद्यालय' औरंगाबाद येथे सुरु केले
* १९४७ - स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री बनले. २९ ऑगस्टला भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली
* १९४८ - डॉ. शारदा कबीर उर्फ माई यांच्याशी १५ एप्रिल १९४८ रोजी दिल्ली येथे विवाह झाला.
-हिंदू कोड बीलसंसदेत मांडले पण विरोध झाल्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
* १९५६ - दिनांक १४ ऑक्टोबररोजी नागपूर (दीक्षाभूमी)येथे हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
* ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले
* बाबासाहेब आंबेडकर यांचीसमाधी चैत्यभूमी, दादर (मुंबई)येथे आहे.
इतर महत्वाचे-
बाबासाहेबांच्या प्रिंटींग प्रेस चे नाव 'भारत प्रिंटींग प्रेस' होते.
'रानडे, गांधी आणि जीना' हेपुस्तक त्यांनी लिहिले.
नागपूर येथे रिपब्लिकन पक्षाची घोषणा केली (स्थापना - १९५८- एन शिवराज)
१९९१ - साली भारत सरकारचा मरणोत्तरभारतरत्नपुरस्कार - (१९९१ हे वर्ष सामाजिक न्याय वर्ष म्हणून पाळण्यात आले)
"शिका, संघटीत व्हा आणि लढा" हा संदेश तरुणांना दिला.****

No comments:

Post a Comment